वंचितच्या महामोर्चाला जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते राहणार हजर

Mahawani

२० जुलैला मुंबईत मोर्चा पावसाळी अधिवेशन मुंबई मंत्रालयावर गायरान धारक शासकीय महसूल जमिनीवरील अतिक्रमण धारकाचा मोर्चा
श्री. कुशल मेश्राम यांची माहिती Khushal Meshram

महावाणी -विरेंद्र पुणेकर
(१८ जुलै २०२३)

    चंद्रपूर: न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील २लाख २२ हजार १३५ गरीब अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.येत्या ३० जुलैपर्यंत त्यांना अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्णयामुळे राज्यातील लोक  दहशतीत आहेत. अतिक्रमांच्या नावाखाली लाखो लोकांचे छत हिसकवून त्यांना बेघर करण्याचा डाव असून या वंचित बहुजन आघाडीतर्फे २० जुलै रोजी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील १)गायरानधारक शासकीय महसूल जमिनी  अतिक्रमणधारकाच्या नावे नियमानुकुल करा.२) गायरानधारक भूमिहीनाच्या शेतीचा सातबारा द्या. ३)बेघर अनुसूचित जाती जमाती आदिवासी भटके-विमुक्त भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभ देत,जागा सरसकट सातबारा मालकी हक्काचा करा ४) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेने अंतर्गत भूमिहीनांना जमिनी देत. त्यासाठी कालबद्ध कृतीकार्यक्रम शासनाने राबाबत.५) गायरानाच्या प्रलंबित प्रकरणाचा सकारात्मक पद्धतीने भूमिका घेत दावेधारकांना जमिनी देण्यात याव्या.असे मुद्दे असून गायरान अतिक्रमण जमिनी धारकांनी  मोर्चा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते महाराष्ट्र राज्य  कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम कुशल मेश्राम यांनी केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  

पंजाब राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर निर्णया देताना संपूर्ण देशात दहा हजार हेक्टरहून अधिक जमीन अतिक्रमाखाली असल्याचे निदर्शनात आले त्यानुसार राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली आहे नियमानुसार २० ते ३० वर्षापासून वास्तव्याला  असणाऱ्यांचे अतिक्रमण नियमाकुल  केले जाते. अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहेत मात्र न्यायालयाचा आधार घेऊन नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे.

या आपल्या देशातील प्रत्येक भूमिहीन,दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बहुजन,भटके विमुक्त आणि वंचित समूहातील परिवार स्वतःच्या मालकी  हकाच्या जमिनीचा मालक झालं पाहिजे असे विचार वंचित बहुजन आघाडीचे नेते महाराष्ट्र राज्य  कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top