Wamanrao Chatap : वामनराव चटप यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Mahawani

शेतकरी हितासाठी चटप यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा निर्धार

Wamanrao Chatap: Spontaneous response to the visit of Wamanrao Chatap
संग्रहित छायाचित्र


राजुरा: शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांचा संपूर्ण मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू असून गावागावात नागरिक त्यांचे जोरदार स्वागत करीत आहेत. गोंडपिपरी आणि जिवती तालुक्यात झालेल्या सभांमध्ये "अब की बार किसान सरकार" या घोषणांनी उत्साहाला उधाण आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडून चटप यांनी तातडीने त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. काही गावकऱ्यांनी "एका दिवसाच्या निर्णयाने पाच वर्षांचे वाटोळे होते," असे म्हणत शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. Wamanrao Chatap


राज्यात कॉंग्रेस-प्रणीत महाविकास आघाडी आणि भाजप-प्रणीत महायुती हे पक्ष आलटून-पालटून सत्तेत येत आहेत, मात्र शेतकरी, युवक आणि महिला यांच्या समस्यांवर कोणताच ठोस उपाय करण्यात आलेला नाही. सत्ताधाऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सत्ता मिळताच उद्योगपती-धार्जिण्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य संघटना, आणि विदर्भ राज्य पक्ष यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे.


या आघाडीचे उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला, व्यापारी, आदिवासी, अनुसूचित जाती यांचे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे. यापूर्वी या संघटनांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करत नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत, त्यामुळे या आघाडीवर जनतेचा विश्वास पुन्हा जुळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


                                                                      


ॲड. वामनराव चटप हे राजुरा विधानसभा क्षेत्रात तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊन विकासकामांत अग्रेसर राहिले आहेत. पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आंदोलनांद्वारे त्यांनी जनतेचे प्रश्न सरकार दरबारी पोहोचवले आणि त्यावर न्याय मिळवला. आजही गावागावात त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.


गाव, गुढे आणि वाड्यांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना केल्या आहेत. १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी रस्ते, पिण्याचे पाणी, जिल्हा परिषद शाळा, शासकीय कार्यालये उभारण्यावर भर दिला आणि कमी वेळेत विकासकामांचे जाळे विणले. शासकीय निधीचे वितरण विदर्भ आणि मराठवाड्यापासून दूर ठेवण्याच्या प्रथेला विधानसभेत प्रभावीपणे विरोध करून त्यांनी हा अन्याय थांबवला.


गेल्या १५ वर्षांत या भागाचा विकास थांबला असून नागरिकांना आता बदलाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. पुन्हा विकासाचा प्रवाह गतिमान होण्यासाठी ॲड. वामनराव चटप यांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


राजुरा मतदारसंघातील नागरिकांचा वाढता पाठिंबा परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या यशासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखालील विकासप्रकल्पांनी पूर्वी या भागाचा चेहरा-मोहरा बदलला होता. लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांची नेतृत्व क्षमता आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.


राजुरा मतदारसंघातील नागरिकांना आता पुन्हा गतकालातील विकास हवा आहे. ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी हीच परिवर्तनाची वाटचाल सुरू करेल, असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे. Wamanrao Chatap


शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या नेतृत्वाखाली राजुरा पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर येईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.


#WamanraoChatap #MaharashtraPolitics #Rajura #TransformationAlliance #FarmerRights #Mahawani #MahawaniNews #Chandrapur #Korpana #MahawaniNewsHub ##WamanraoChatap #MaharashtraPolitics #Rajura #TransformationAlliance #FarmerRights #AgricultureReforms #VidarbhaDevelopment #YouthEmpowerment #WomensWelfare #Chandrapur #Korpana #Jiwati #Gondpipari #PoliticalLeadership #Mahawani #MahawaniNews #MahawaniNewsHub #VeerPunekar #RajuraDevelopment #IndependentFarmersMovement #MaharashtraElections #RuralTransformation #SwabhimaniShetkariSanghatana #PragatiWithChatap #FarmersVoice #MahawaniUpdates #VidarbhaTransformation

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top